Sunday, February 16, 2020

महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याचा निर्धार करा - जे. पी.नड्डा

महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याचा निर्धार करा!
भाजपा चे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे आवाहन

सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावून राज्यात भारतीय जनता पार्टीला स्वबळावर सत्तेत आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी रविवारी केले.

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्य परिषदेच्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
श्री.नड्डा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री पीयूष गोयल, पक्षाच्या राज्याच्या प्रभारी सरोज पांडे,छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री यावेळी उपस्थित होते.

श्री. नड्डा म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपा च्या नेतृत्वाखालील महायुतीला स्पष्ट बहुमत दिले.मात्र आमच्या मित्रपक्षाने दगलबाजी करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली.ही अभद्र, अनैसर्गिक आघाडी आहे.या आघाडीविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी गावपातळीपर्यंत प्रखर विरोधी पक्षाची भूमिका बजावावी. आता कार्यकर्त्यांनी पक्षाला स्वबळावर सत्तेत आणण्यासाठी कटिबद्ध झाले पाहिजे.
श्री.नड्डा यांनी 370 वे कलम रद्द झाल्यामुळे काश्मीरच्या विकासाला मिळालेली गती, मोदी सरकारने देशाला 5 ट्रीलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी घेतलेले निर्णय याचा आढावा घेतला.
श्री.नड्डा म्हणाले की, भाजपा हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे.370 व्या कलमाविरोधात 1952 पासून म्हणजे जनसंघाच्या स्थापनेपासून आमच्या कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्यांनी लढा दिला .370 वे कलम रद्द करणे हा आमच्या दृष्टीने भावनेचा विषय नव्हता.हे कलम रद्द केल्याने काश्मीरच्या विकासातील अडथळे दूर झाले आहेत.काश्मीरमधील दहशतवाद संपू लागला आहे.काश्मीरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांनी भरघोस मतदान केले. श्रीनगर मध्ये 100 टक्के मतदान झाले, असेही नड्डा यांनी सांगितले...
_________________________________
स्व. प्रा. रामभाऊ कापसे नगर, नेरूळ, नवी मुंबई येथे आयोजित भाजपा राज्य परिषदेच्या समारोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने झाला. या संबोधनातील मुख्य मुद्दे असे...

नूतन अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचे अभिनंदन.
विधानसभेचा सामना जिंकणाऱ्या संघाचे ते कर्णधार कालही होते आणि आजही तुम्ही विजयी संघाचे कर्णधार.

सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष होतो, हे केवळ भाजपामध्येच होऊ शकते.

'विरासत'मध्ये आपल्याकडे कुणाला काही मिळत नाही. पक्ष हे आपले परिवर्तनाचे माध्यम आहे आणि सच्चा कार्यकर्ता ही आपली बारुद आहे.

‪काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर भारताचा तिरंगा डौलाने फडकताना पाहणारे आपण भाग्यशाली कार्यकर्ते आहोत.‬

‪प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर निर्माण होताना पाहणारे आपण भाग्यशाली कार्यकर्ते ठरणार आहोत. ‬

‪प्रभू श्रीरामचंद्रांचे अयोध्येला जाऊन दर्शन जरूर घ्या, तेथे कदाचित दर्शनमात्राने हिंदूहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे तुम्हाला स्मरण होईल.

‪नागरिकता देणारा कायदा असताना जो गदारोळ उठविला जात आहे, तो साधा नाही. एक मोठे षडयंत्र त्यामागे आहे.‬
‪सतेच्या तडफडीतून काही पक्ष देशात तणाव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोठे मोठे नेते बुद्धिभेद करीत आहेत.

‪आम्ही सारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान मानतो.‬

‪दुसरे संविधान कुणीही तयार करू शकत नाही. ऐकून घेण्याचे दिवस संपले, आता सुनवण्याचे दिवस आहेत.

‪विश्वासघात तर झाला.‬

‪पण आता रडण्याचे नाही तर लढण्याचे दिवस आहेत.‬
‪आपण सारे शिवाजी महाराजांचे मावळे आहोत.‬
‪22 किल्ले गेले, तर 44 किल्ले परत घेण्याची आपली ताकद आहे.

‪विरोधासाठी विरोध करणार नाही.‬
‪पण जनतेच्या विरोधातील एकही निर्णय खपवून घेणार नाही.‬
‪सरकारमध्ये बसलेले चिंतामुक्त झाले, पण आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.‬

‪आज महिलांवर प्रचंड अन्याय होत असताना सरकार गप्प आहे.‬

‪22 तारखेला प्रत्येक तहसीलस्थानी सरकारला जाब विचारला जाईल.‬

‪सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही, ते तसेच पडेल.‬
‪पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. ‬
‪तुम्ही तिघे एकत्र आहात ना? ‬
‪तुम्हाला कळून जाईल जनता आजही कुणाच्या बाजूने आहे.

‪आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, त्यांच्या वंशजांचा अपमान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान. पण शिवसेना गप्प आहे.‬

‪'शिदोरी' मासिकावर बंदी टाकून दाखवा.

‪आपल्याला धर्मासाठी लढायचे आहे.‬
‪जे अधर्माच्या सोबत आहेत, ते जुने मित्र असेल तरी त्यांच्याविरोधात सुद्धा लढावे लागेल.

‪आपल्या विजयाची सुरूवात नवी मुंबईपासून होईल.‬
‪औरंगाबाद महापालिकेवर सुद्धा भाजपाचाच झेंडा फडकेल. मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात हे विजयी अभियान असेच सुरू राहील...

No comments:

Post a Comment